महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑक्टोबर | टोलच्या मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलखोल केली आहे. फडणवीस टोलच्या मुद्द्यावरून धांदात खोटं बोलत आहेत, असं सांगतानाच टोल हा काही काश्मीरचा विषय नाही. टोल रद्द केले नाही तर आम्ही टोल नाके जाळून टाकू असा संतप्त इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. राज ठाकरे हे पत्रकार परिषदेत बोलत होते.