महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ मार्च । आगामी लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रात दोन जागा मिळाल्या पाहिजेत. शिर्डी या लोकसभा मतदारसंघात मी स्वतः निवडणूक लढणार आहे.
भाजपने जर मला लोकसभेची जागा सोडली, तर मी कमळ चिन्हावर निवडणूक लढणार नाही, तर मी माझ्या रिपब्लिकन पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढेल, अशी ठाम भूमिका रिपब्लिकन पक्षाच्या नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी घेतली आहे.
जोगेश्वरी पश्चिम येथील किल्लेदार ग्राऊंडवर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रिपाइंचे मुंबई उपाध्यक्ष सोहेल शेख यांच्या नेतृत्वात दलित-मुस्लिम एकता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधला.