ईडीचा कोर्टात अजब दावा ; शुगर वाढवण्यासाठी केजरीवाल …….

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ एप्रिल ।। मधुमेह असूनही अरविंद केजरीवाल केवळ शुगर वाढवून जामीन मिळवण्यासाठी तुरुंगात मिठाई, बटाटापुरी आणि आंबे खातात. मुद्दाम साखरेचा चहा घेतात, असा अजब दावा आज ईडीने विशेष न्यायालयात केला. रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार होत असल्याने केजरीवाल यांना डॉक्टरांचा सल्ला घेण्याची परवानगी द्यावी, अशी याचिका करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणीवेळी ईडीने हा दावा केला. ईडीने केवळ सवंग प्रसिद्धीसाठी हे आरोप केल्याचे नमूद करत केजरीवालांनी आरोप फेटाळले.

अरविंद केजरीवाल यांना वारंवार विनंती करूनही इन्सुलीनचे इंजेक्शन दिले जात नाही. ईडीच्या मदतीने त्यांच्या हत्येचा कट भाजपने रचला आहे, असा आरोप आपच्या नेत्या आतिशी यांनी केला. दिल्लीत आपचा पराभव करू न शकल्यामुळे भाजपला अडसर असलेल्या केजरीवाल यांना तुरुंगात ठेवून त्यांची हत्या करण्याची योजना आखली जात आहे. केजरीवाल दररोज 54 युनिट्स इन्सुलीन घेतात. परंतु भाजप ईडीच्या माध्यमातून त्यांच्या जिवाशी खेळत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *