धनत्रयोदशीला 55 टन सोन्याची विक्री, बाजारपेठेत 850 कोटींची उलाढाल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३०ऑक्टोबर ।। दिवाळी सणातील धनत्रयोदशीस (Dhanteras) नागरिक आवर्जून सोने खरेदी करतात, या मुहूर्तावर सोने खरेदी-विक्रीमुळे मोठी उलाढाल झाली आहे. सोन्याचा दर उच्चांक गाठत असताना देखील ग्राहकांनी धनत्रयोदशीला आवर्जून सोने खरेदीचा मुहूर्त साधला. शुभ दिवस पाहून ग्राहकांनी बाजारपेठेत जाऊन भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेले असताना आपल्या क्षमतेनुसार सोन्या-चांदीची खरेदी केली. धनत्रयोदशीनिमित्त देशभरातील सराफा बाजारांमध्ये मोठी उलाढाल झाली आहे. धनत्रयोदशीच्या (Dhanteras) निमित्ताने काल (मंगळवारी) मुंबईत तब्बल एक हजार किलो सोन्याची खरेदी-विक्री झाली आहे. धनत्रयोदशीच्या (Dhanteras) निमित्ताने बाजारात पंधराशे कोटी रुपयांची उलाढाल झाली. त्यात सोने- चांदीचा वाटा किमान 850 कोटी रुपयांच्या घरात होता. धनत्रयोदशीला सोने-चांदी किंवा धातू खरेदीला महत्त्व असते. त्यानिमित्ताने मंगळवारी झवेरी बाजारात मोठी गर्दी झाली होती.

अपेक्षेपेक्षा जवळपास 40 टक्के अधिक खरेदी-विक्री झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत झवेरी बाजार येथील मुंबई ज्वेलरी असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमारपाल जैन यांनी माहिती दिली. ‘मंदा सोन्याने उच्चांकी दर गाठल्याने वास्तवात खरेदी चांगली, परंतु सामान्य असेल, असा अंदाज होता. मात्र, संपूर्ण देशात 35 ते 40 टन सोने उलाढालीची शक्यता असताना यंदा 55 टन सोन्याची खरेदी झाली. मुंबईतील हा आकडाही मोठा होता.

प्रारंभी केवळ लहान दागिन्यांची खरेदी होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. प्रत्यक्षात सोन्याच्या बिस्किटांपासून कानातले, अंगठ्या व मंगळसूत्राचीही खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली, असे त्यांनी सांगितले. दर अधिक असल्याने मुंबईत 750 ते 800 किलो सोने धनत्रयोदशीच्या (Dhanteras) निमिताने खरेदी होईल, असा व्यावसायिकांचा अंदाज होता. प्रत्यक्षात 1 हजार किलो सोन्याची खरेदी-विक्री झाली. अनेक ग्राहकांनी कमी दरांवर खरेदी केलेले जुने सोने मोडून नवीन दागिने तयार केले. काल (मंगळवारी) सोन्याचा दर 82 हजार रुपये प्रतितोळा होता. त्यानुसार 850 कोटी रुपयांची उलाढाल मुंबईत झाली आहे. दुसरीकडे चांदीनेही 1 लाख रुपये किलोचा टप्पा गाठला असताना त्याची उलाढाल काही रोकडा कोटीत होती, असे व्यावसायिकांनी यावेळी सांगितले आहे.

35 हजार कोटींची उलाढाल
धनत्रयोदशी (Dhanteras) निमित्ताने देशभरात 35 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे (कॅट) राष्ट्रीय सचिव शंकर ठक्कर यांनी सांगितले आहे. महामुंबईतील हा आकडा दोन हजार कोटी रुपयांच्या घरात होता. त्यात सोने-चांदीसह वाहन खरेदी, इलेक्ट्रॉनिक्स सामान, कपडे, सजावटीच्या वस्तू, स्वयंपाकाच्या, व इतर वस्तू यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *