महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ मार्च ।। ‘‘महायुतीमधील जागावाटपाचा निर्णय दोन ते तीन दिवसांत होणार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यासह मित्र पक्ष यांच्या जागा निश्चित झाल्यानंतर बारामतीचा उमेदवार जाहीर करण्यात येईल,’’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
आंबेगाव पठार येथे चिंतामणी ज्ञानपीठ व अप्पा रेणुसे मित्र परिवार आयोजित आणि प्रकाशित ‘आरोग्यासाथी जपूया ऐश्वर्य आरोग्याचे’ पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, ‘‘सद्यःस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इतका समर्पक नेता देशात दुसरा कुणी नाही. देशाचे पंतप्रधान चोवीस तास काम करत आहेत. त्यांनी गेल्या नऊ वर्षांत एकदाही सुट्टी घेतलेली नाही. त्यांच्यामुळे भारत देशाकडे जगाचे लक्ष लागले आहे. भारत काय करतोय, याकडे सगळ जग पाहते आहे. मोदी यांच्याकडे देशाच्या विकासाचा एक अजेंडा आहे. विकसित देशाचे रोलमॉडेल मोदी यांच्याकडे आहे.’’