84 total views
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ मार्च । “राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना सावरकरांबद्दल खूप आदर आहे, ते म्हणतात ते योग्य आहे. पण त्यांनी राहुल गांधींना सावरकरांबद्दल आतापर्यंत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागायला सांगावी,” असे वीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंची आताची भूमिका योग्य पण मुख्यमंत्री असताना शिदोरी या मुखपत्रावर कारवाई का केली नाही. आता पक्षीय राजकारणासाठी सावरकरांचा वापर केला जात आहे, अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
It is really sad to see how Savarkar's name is being defamed by Rahul Gandhi for politics. It seems they are polarizing Muslims also. In Maharashtra also, politics is being done in Savarkar's name. I request not to use the name of Savarkar for their own benefit: Ranjit Savarkar,… pic.twitter.com/TcVcfwYdBd
— ANI (@ANI) March 28, 2023
राजकारणासाठी राहुल गांधींकडून सावरकरांचे नाव बदनाम केले जात आहे, हे पाहून खरोखरच वाईट वाटते. महाराष्ट्रातही सावरकरांच्या नावावर राजकारण केले जात आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना सावरकरांबद्दल आदर असेल, पण जोपर्यंत ते सावरकरांना पाठिंबा देत नाहीत, तोपर्यंत त्यात काही अर्थ नाही. अल्टिमेटम देऊनही काँग्रेस थांबली नाही आणि त्यांनी (उद्धव ठाकरे गट) अद्याप काँग्रेसपासून फारकत घेतलेली नाही. सावरकरांचे नाव स्वतःच्या फायद्यासाठी वापरू नका, अशी विनंती रणजित सावरकर यांनी केली आहे.
Sharad Pawar ji has a lot of respect for Savarkar, but he should go ahead and ask Rahul Gandhi to apologise for his statements he has given so far on Savarkar: Ranjit Savarkar, Grandson of VD Savarkar pic.twitter.com/01jTfSnMXT
— ANI (@ANI) March 28, 2023
शरद पवार यांनी १९८९ ला सावरकर स्मारकात चांगले भाषण केले होते. ते म्हणतात ते योग्य आहे पण त्यांचे साथीदार ऐकत नसतील तर शरद पवार व उद्धव ठाकरेंनी अपमान करू नका असे म्हणणे, काँग्रेसने अपमान करत राहणे आणि या तिघांनी आघाडी कायम ठेवणे हे चुकीचं आहे. काँग्रेस यापुढे बगल देईल पण सावरकांवरांचा जो अपमान झाला आहे, त्याबद्दल राहुल गांधी यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. राहुल गांधी गप्प बसले म्हणुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने किंवा शरद पवार यांनी माफ करणे हे उत्तर नाही. यांना खरोखरच आदर असेल तर राहुल गांधी यांच्याकडून माफी मागून घ्यावी, असेही रणजित सावरकर यांनी म्हटले आहे.