महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ जुन ।। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आज दुष्काळाचा पाहणी दौरा करताय. पुरंदर आणि इंदापूर तालुक्यात त्यांचा हा दुष्काळ पाहणी दौरा असणारेय. त्यापूर्वी शरद पवार यांनी मंगळवारी 11 जूनला मध्य प्रदेशातून बारामतीत आलेल्या जैन समाजाच्या जैन मुंनीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत युगेंद्र पवारही उपस्थितीत होते. यावेळी जैन मुंनी आणि शरद पवार यांच्यामध्ये जैन धर्माविषयी चर्चा झाली.
शरद पवार शाकाहारी की मांसाहारी?
गेल्या वर्षी मटन खाल्ल्यामुळे शरद पवारांनी दगडूशेठ गणपतीचे मंदिरात जाऊन दर्शन घेणं टाळलं. तरीदेखील अनेकांना प्रश्न पडला होता की, शरद पवार हे शाकाहारी आहेत की मांसाहारी. हाच प्रश्न मुंनी यांनाही पडला होता, त्यांनी शरद पवार यांना विचारलं की, तुम्ही मांसाहारी की शाकाहारी?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील, तुम्हा सर्वांचे आशीर्वादाने देशाच्या लोकसभेमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी ज्या आठ सहकाऱ्यांना आपण दिली ते आठही विजयी खासदार, सन्माननीय व्यासपीठ आणि हजारोंच्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आणि… pic.twitter.com/PkROpuLzOE
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 11, 2024
शरद पवार म्हणाले की…
मुंनीच्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, ‘आजकाल मी शंभर टक्के शाकाहारी आहे. याआधी मी शाकाहारी नव्हतो. पण गेल्या एक वर्षापासून मी पूर्णत: शाकाहारी झालो आहे.’
शरद पवार दुष्काळ दौऱ्यावर
शरद पवार पुढे म्हणाले की, आज आनंदाचा दिवस असून दुष्काळी दौऱ्यासाठी मी निघतो तेव्हाच पावसाला सुरुवात होते, असा माझा अनुभव आहे. हे पावसासाठी चांगलं वर्ष आहे. त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतील.
'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार' पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पुणे येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आजचा दिवस पक्ष स्थापनेचा आनंद व्यक्त करण्याचा दिवस आहे. तुम्ही सगळ्यांनी संघटना कशी उभी केली? या संघटनेने गेल्या २५ वर्षांत महाराष्ट्रात आणि… pic.twitter.com/W9iXAbgAxz
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 10, 2024
‘यंदा उत्तर प्रदेश साखर उत्पादन दोन नंबरला असून राज्य सरकारने शहाणपण दाखवले नाही. महाराष्ट्रामध्ये साखरेचे उत्पादन जास्त झालं तरी केंद्र सरकारने निर्बंध आणले. त्यांना मी सांगितले होते निर्बंध आणू नका. मला सांगण्यात आले की, निवडणूक होईलपर्यत आम्ही तुमचे ऐकणार नाही.’ असंही सांगत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
