![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ सप्टेंबर ।। येत्या काही दिवसांतच यंदाचा मान्सून देशातून निरोप घेणार आहे. त्यापूर्वी पावसाने काही राज्यांमध्ये धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
दरम्यान महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाल्यास महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरण आणि पाऊस असेल. पुणे आणि परिसरात काही प्रमाणात पाऊस पडेल. त्यामुळे नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
15 Sept, मोरया🌺अनंत चतुर्दशी; पावसाचे मार्गदर्शन (आयएमडी मॉडेल्स):
17 सप्टेंबर; सिंधुदुर्ग-गोवा व पूर्व विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता.उर्वरित;मुंबई, ठाण्यासह राज्यातील बहुतांश ठिकाणी कोरड्या ते अतिशय हलक्या सरींची शक्यता.
तपशीलवार अद्यतनांसाठी,कृपया IMD वेबसाइट पहा. pic.twitter.com/lQf5IyVrux— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 15, 2024
पुण्यात काय परिस्थीती?
उद्या अनंत चतुर्थी असल्याने आज पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी भाविकांना शेवटचे घराबाहेर पडता येणार आहे.
अशात आज पुण्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, दुपारी पावसाच्या काही सरी पडू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांनी पावसाचे वातावरण पाहून घराबाहेर पडावे.
दरम्यान सध्या देशाच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने म्हटले आहे की, पश्चिम बंगालच्या गंगा किनारी प्रदेशात आणि बांगलादेशच्या लगतच्या भागात एक दाब तयार झाला आहे, ज्यामुळे नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये 15 आणि 16 सप्टेंबर दरम्यान आणि आसाम आणि मेघालयमध्ये 18 ते 20 सप्टेंबर दरम्यान पाऊस पडेल.
यासोबतच हवामान खात्याने पश्चिम बंगाल आणि ओडिशा या दोन्ही राज्यांसाठी रेड अलर्ट जारी करत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. झारखंडमध्येही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.