महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ मार्च ।। Maharashtra Weather News : राज्यावर सूर्यदेवाचा प्रकोप सुरु असून दिवसागणित त्यामुळं जाणवणारा उकाडा आणखी वाढतच चालला आहे. किंबहुना या आठवड्याचा शेवटही उकाड्यानंच होणार असल्याचा इशारा हवामान विभागान दिला आहे. राज्यात सध्या विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातही तापमानवाढ कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात सध्या अनेक ठिकाणी तापमानानं 35 अंशांची मर्यादा ओलांडली असून, बुधवारी अकोल्यामध्ये राज्यातील नव्हे, देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. इथं पारा 42.8 अंशांवर पोहोचला होता. तापमानाचा हा आकडा पुढील दोन दिवसांपर्यंत कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
पुढील 3 दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात रात्री उष्ण वातावरण राहण्याची शक्यता आहे.तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5… भेट द्यI pic.twitter.com/fN2irBwAbN
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) March 27, 2024
तापमानाची आकडेवारी खालीलप्रमाणे
पुणे 38.9 अंश सेल्सिअस
धुळे 39.5 अंश सेल्सिअस
जळगाव 40.8 अंश सेल्सिअस
कोल्हापूर 38.2 अंश सेल्सिअस
महाबळेश्वर 33.3 अंश सेल्सिअस
नाशिक 38.3 अंश सेल्सिअस
निफाड 37.8 अंश सेल्सिअस
सातारा 38.9 अंश सेल्सिअस
रत्नागिरी 32.2 अंश सेल्सिअस
छत्रपती संभाजी नगर 39.5 अंश सेल्सिअस
नागपूर 39 अंश सेल्सिअस