‘बंपर-टू-बंपर’ विमा म्हणजे काय? 1 सप्टेंबरपासून कार विम्याबाबतचे नियम बदलतील ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑगस्ट । Bumper-to-Bumper insurance: मद्रास उच्च न्यायालयाने कार विम्याबाबत मोठा निर्णय दिलाय. न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, 1 सप्टेंबरपासून नवीन वाहनांसाठी ‘बंपर-टू-बंपर’ विमा असणे अनिवार्य केले पाहिजे. हा विमा सध्याच्या कार विम्यापेक्षा वेगळा असेल. ड्रायव्हर, प्रवासी आणि कार मालक कार खरेदीवर पाच वर्षांसाठी विमा उतरवतात.

“बंपर टू बंपर” विमा किमान पाच वर्षांसाठी आवश्यक
न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, “बंपर टू बंपर” विमा किमान पाच वर्षांसाठी आवश्यक आहे. कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, 1 सप्टेंबरनंतर जेव्हा एखादी कार विकली जाईल, तेव्हा ही स्वतंत्र विमा पॉलिसी आवश्यक आहे. याअंतर्गत चालक, प्रवासी आणि कार मालक यांचे कव्हरेज वेगळे असेल. सध्याच्या नियमानुसार, कार खरेदी केल्यानंतर पाच वर्षांच्या पुढे बंपर विमा वाढवण्याचे कोणतेही धोरण नाही.

न्यू इंडिया अॅश्युरन्सच्या याचिकेवर सुनावणी
मद्रास उच्च न्यायालय एका प्रकरणात न्यू इंडिया अॅश्युरन्सच्या वतीने रिट याचिकेवर सुनावणी करत होते. 7 डिसेंबर 2019 रोजी इरोड विशेष जिल्हा न्यायालय (मोटर अपघात दावा न्यायाधिकरण) च्या निर्णयाला विमा कंपनीने आव्हान दिले होते. आपल्या याचिकेत न्यू इंडिया अॅश्युरन्सच्या वतीने असे म्हटले होते की, कंपनी केवळ थर्ड पार्टीमुळे झालेल्या नुकसानीस जबाबदार आहे. जर कार चालकाच्या बाजूने अपघात झाला तर कंपनी या नुकसानास जबाबदार नाही.

कार खरेदी करताना विम्याबद्दल संपूर्ण माहिती घ्या
निकाल देण्यापूर्वी न्यायालयाने म्हटले की, जेव्हा एखादी व्यक्ती कार खरेदी करते तेव्हा विम्याबद्दल ना संपूर्ण माहिती शेअर केली जाते आणि ना ग्राहकांना त्यात रस असतो. एखादी खरेदीदार कार खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम देण्यास तयार आहे हे दुःखद आहे, परंतु विमा खरेदी करताना तो थोड्या रकमेसाठी संकोच करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *