महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० सप्टेंबर ।
मेष
मेष राशीच्या व्यक्ती ना आज दिवस अनुकूल आहे. कौटुंबिक आणि आर्थिक व्यवहार याकडे लक्ष पुरवावे लागेल. नवीन संधी मिळेल. पितृपक्ष काळात नामजप, उपासना करावी. धनलाभ होणार .
वृषभ
या राशीच्या व्यक्ती रसिक,सुंदर,कलाप्रेमी अश्या असतात. आज ग्रहस्थिती सांभाळून रहा असे सुचवते आहे. मन उद्विग्न झाले तर ओम रं राहवे नम: ह्या मंत्राचा जप करावा. निर्णय टाळा. आज मोठा व्यवहार करणे टाळा .
मिथुन
हजरजबाबी, प्रसन्न मिथुन राशीच्या व्यक्तींना आज दिवस ठीक आहे . थोडा कामात त्रास संभवेल . दिवस शांततेत घालवा. नामस्मरण करा.पितृपक्ष काळात शिधा दान करणे फार फायद्याचे असते. दान करा. धनलाभ योग आहे .
कर्क
कर्क राशीच्या व्यक्ती हळव्या,कुटुंब प्रेमी असतात. व्यवसाय करतांना भावनिक होऊ नका. मानसिक आंदोलने होतील.प्रकृती सांभाळा.असे सुचवत आहे. प्रवास योग येतील. आर्थिक स्थिती चांगली राहील.
सिंह
सिंह राशीचे लोक मानी, उदार आणि कर्तव्यनिष्ठ असे असतात. सध्या कामाच्या ठिकाणी ताण जाणवू शकतो खर्चात वाढ होईल . कलेत रुची वाढेल . दिवस चांगला आहे. आर्थिक फायदा होणार .
कन्या
या राशीच्या व्यक्ती चिकित्सक, स्वाभिमानी, हुशार असे वर्णन करता येईल. आज नवीन संधी मिळतील . पितृपक्ष काळात ईश्वरी उपासना ,दान करावे.आरोग्य सांभाळावे .
तुळ
या राशीच्या व्यक्ती न्याय प्रिय, सडेतोड आणि आनंदी असतात . आज दिवस प्रकृतीची काळजी घेण्याचे सुचवते आहे. मन उद्विग्न राहील . आर्थिक स्थिती चांगली असेल . अन्न दान आणि उपासना करावी
वृश्चिक
अत्यंत ऊर्जावान ,रागीट, कार्य कुशल अश्या या व्यक्ती सध्या पितृ दोषाचा प्रभाव क्षेत्रात आहेत. नकारात्मक विचार येतील. जपून रहा. आध्यात्मिक उन्नती साठी दिवस अनुकूल आहे. जोडीदाराची काळजी घ्या.
धनु
मुद्देसूद, हुशार आणि कामाचा उरक असणार्या व्यक्ती. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक नियोजन करा . कुटुंबातील व्यक्ती भेटू शकतात. धार्मिक निष्ठा वाढेल. दिवस मध्यम जाईल.
मकर
या राशीचे लोक अत्यंत चिकाटीने काम करणारे,शांत, स्थिर बुद्धी असे असतात. सांभाळून रहा. दिवस काही वाचन,अध्ययन करण्यात घालवा. शनी देवांची उपासना करा.
कुंभ
या राशीचे लोक काटेकोर ,अभ्यासूवृत्ती, असतात . कुंभ व्यक्ती आज घरात वेळ घालवतील. जास्तीचे काम उरकून घ्या. घरातील व्यक्तींच्या सोबत रहा.मंगळ दान करा. दिवस चांगला आहे. धनलाभ होणार .
मीन
या राशीचे लोक संकोची , शांत, मन मिळावु आणि समाधानी व्यक्ती असतात. आज ज्यांना फोन करायचा राहिला असेल त्यांच्या शी संपर्क होईल. बहिण भावंड भेट .छोटासा प्रवास घडेल .दिवस समाधान कारक आहे.