महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ ऑक्टोबर । सणासुदीच्या काळात देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी खूशखबर आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने कोरोना काळातील प्रवासावरील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 18 ऑक्टोबरपासून देशांतर्गत विमान प्रवास 100 टक्के प्रवाशांसह करण्यास मंजुरी मिळाली आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यावर मे 2020 मध्ये 80 टक्के प्रवाशांसह देशांतर्गत विमानसेवा सुरू होती. त्यानंतर 1 जूनपासून प्रवाशांची संख्या 50 टक्क्यांवर आणण्यात आली. जुलैमध्ये हवाई वाहतूक मंत्रालयाने देशांतर्गत प्रवाशांची संख्या 50 वरून 65 टक्क्यांवर नेण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यावर कोरोना प्रतिबंधांसह 100 टक्के प्रवांशांसह विमान उडवण्याची मंजुरी देत सणासुदीच्या काळात विमान प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा दिला आहे.