Maharashtra : राज्यात नवे निर्बंध लागू; पर्यटन स्थळांवर जमावबंदी लागू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३१ डिसेंबर । ओमायक्रॉन आणि अचानक दुपटीनं वाढणाऱ्या कोरोना आकडेवारीमुळे राज्यात नवे निर्बंध लावण्यात आले आहेत. मध्यरात्रींपासून राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेयत. नव्या नियमांनुसार सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळे फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत करण्याची मर्यादा घालण्यात आलेय. तसचं अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांनाच उपस्थितीची परवानगी असेल. ३१ डिसेंबरची गर्दी लक्षात घेता पर्यटन स्थळांवरही जमावबंदी लागू करण्याचा निर्णय सरकारनं घेतालय. तसंच परिस्थितीनुसार स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा देण्यात आलेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Facebook
  • X (Twitter)
  • LinkedIn
  • Mix
  • More Networks
Copy link