पुण्यातून रायगडला जाण्यासाठी नवा मार्ग ; प्रवासाचा वेळ वाचणार, जाणून घ्या सविस्तर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ जुलै । वेल्हे तालुक्यातील भोरडी ते महाड तालुक्यातील शेवते या नवीन रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे रायगडला जोडणारा हा तिसरा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.

स्मार्टफोन क्लिअरन्स स्टोअर, 6299 रुपयांपासून सुरू
सध्या भोर तालुक्यातून वरंध आणि मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटमार्गे रायगड जिल्ह्यात जाता येते. आता नव्याने वेल्हे तालुक्यातून रस्ता होणार असल्याने नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. गेली अनेक वर्षे वेल्ह्यातून महाडला जोडणारा रस्ता करावा, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते.

वेल्हे ते मढेघाट मार्ग खडतर
सुरुवातीला या रस्त्यासाठी वेल्हे ते मढेघाट हा मार्ग निवडण्यात आला होता. त्याचे सर्वेक्षणदेखील झाले होते. मात्र, अतितीव्र चढ-उतार, नागमोडी वळणे, खडक व टेकड्यांचा भूभाग असल्याने नैसर्गिक परिस्थिती प्रतिकूल होती. याशिवाय तांत्रिकदृष्ट्या काम करणे अतिशय खडतर होते. एवढेच नाही, तर भविष्यात वाहतुकीसाठी हा मार्ग धोकादायक, त्रासदायक होऊ शकतो, असेही समोर आले.

पर्यायी रस्ता ठरला अंतिम
यामुळे नव्याने भोरडी, पिशवी, गुगुळशी, पांगारी ते शेवते (रायगड) हा पर्यायी रस्ता आमदार संग्राम थोपटे यांनी सूचवला. संबंधित विभागाने त्याची पाहणी करून अहवाल राज्य सरकारकडे पाठवला. त्यानुसार तेरा किलोमीटरच्या या रस्त्याला मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोनमधून पंचवीस कोटी ३२ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे आमदार थोपटे यांनी सांगितले.

प्रवासाचा वेळ वाचणार
वेल्हे ते भोरडी फाटा ते शेवते हा १८ किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. यातील १३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मान्यता मिळाली आहे. यापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनात २.८ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये सपाटीकरण करून साडेसात मीटर डांबरीकरण रस्ता, पाच ठिकाणी पाइप टाकण्यात येणार असल्याचे वेल्हे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले. उर्वरित २.२ किलोमीटरच्या रस्त्याचा प्रस्ताव संशोधन व विकास (आर अँड डी) विभागाकडे पाठवला आहे. त्या कामासाठी चार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. नवीन मार्ग हा कमी अंतराचा होणार असल्यामुळे पुण्यातून महाड, रायगडला जाण्यासाठी प्रवासाचा वेळे वाचणार असून, इंधन आणि पैशांचीही बचत होणार आहे; तसेच या मार्गावरील पर्यटनालाही अधिक चालना मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *