महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ सप्टेंबर । संपूर्ण महाराष्ट्रात ढोल-ताशांच्या गजरात आणि आनंदात बाप्पाचे आगमन होते. यंदा गणेश चतुर्थी सप्टेंबर महिन्यात असून महिन्याच्या सुरुवातीपासून बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. मात्र आता अनेकांचा संभ्रम हा आहे की, गणेश चतुर्थी नेमकी कोणत्या तारखेला आहे? तुम्हीही गणेश चतुर्थीच्या तारखेत गोंधळलात काय? चला तर मग पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांच्याकडून जाणून घेऊया गणेश चतर्थी नेमकी कधी आहे ते.
‘आद्य शंकराचार्यांचे प्रमुख पीठ शृंगेरी शंकराचार्यांच्या पंचांगानुसार गणेश चतुर्थी 18 सप्टेंबर या तारखेस आहे. ज्योतिष व सर्व शास्त्रात ज्यांचा शब्द प्रमाण मानला जातो असे काशीचे प्रकांड पंडित श्री गणेश्वरशास्त्री द्रवीड गुरुजी व धारवाडचे पंडित राजेश्वर शास्त्री उप्पिनबेट्टिगिरी यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच भारतातील तमाम सनातन सूर्यसिद्धांत पंचांगानुसार गणेश चतुर्थी ही 19 सप्टेंबर रोजी नसून 18 सप्टेंबर या तारखेस आहे याची कृपया सर्व श्रद्धावान गणेश भक्तांनी नोंद घ्यावी.’ असे पंचांगकर्ते देशपांडे यांनी सांगितले आहे. (Ganesh Chaturthi)
दरवर्षी बाप्पाच्या विसर्जनानंतर लोक पुढील वर्षी बाप्पाचे आमगन कधी होणार याची आतुरतेने वाट बघत असतात. यंदासुद्धा बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु असून सर्वत्र जल्लोषाचे वातावरण दिसून. ठिकठिकाणी मंडप, सजावटीची जोरदार तयारी सुरु झाली आहे.