महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जुन ।। लोकसभा निवडणुकीचे निकाल टप्प्या टप्प्याने खुलतान दिसत आहेत. शिरूर मतदारसंघात महावीकास आघाडीचे अमोल कोल्हे आणि महायुतीचे अढळराव पाटील यांच्यात अटी-तटीचा सामना बघायला मिळत आहे.
तिसऱ्या आणि चौथ्या फेरीचे आकडे
तिसऱ्या फेरीत शिवाजीराव अढळराव पाटलांना 69677 मते, तर डॉ अमोल कोल्हे ह्यांना 73700 मते पडली. कोल्हे ह्यांना ह्या फेरीत 8890 मतांनी आघाडी प्राप्त झाली.
चौथ्या फेरीत अढळराव ह्यांना 82590, तर अमोल कोल्हे ह्यांना 1,01059 मते पडली. चौथ्या फेरीत कोल्हे ह्यांना 18469 मतांनी आघाडीवर आले.
