महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.३ जुलै ।। Ashadhi Wari Toll Free : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी गोड बातमी आहे. राज्य सरकारने वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्व टोल वारकऱ्यांसाठी माफ असणार आहेत. ३ जुलैपासून ते २१ जुलैपर्यंत ही टोलमाफी असणार आहे.
यासंदर्भात राज्य सरकाच्या वतीने जीआर देखील काढण्यात आला आहे. अक्षय महाराज भोसले यांनी देखील या टोलमाफीच्या निर्णयाची माहिती दिली आहे. पथकर नाक्यावर वाहनांची गर्दी होऊ नये म्हणून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांची व्यवस्था करावी असं शासन निर्णयात म्हटलं आहे.
पोलीस आणि परिवहन विभागाने आषाढी एकादशीच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती आवश्यकतेप्रमाणे जाहीर करावी. या सर्व सूचना संबंधित अधिकाऱ्यांच्या निर्देशनात आणाव्यात असंही जीआरमध्ये म्हटलं आहे.