मिचेलचे शतक ठरले न्यूझीलंडच्या पराभवाचे कारण ? ; नेमकं कसं ते घ्या जाणून

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ ऑक्टोबर | आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ चा २१वा सामना रविवारी धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. अखेर २ दशकांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भारताने आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव केला. हा सामना ४ विकेटने जिंकून टीम इंडिया अव्वल स्थानावर आली. हा सामना अतिशय रोमांचक असला तरी या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांची कामगिरी अव्वल ठरली. जिथे शमीने आपल्या धारदार गोलंदाजीवर ५ विकेट्स घेत किवी संघाचे कंबरडे मोडले.

डॅरिल मिशेलच्या शतकाने गेम केला

न्यूझीलंडचा मधल्या फळीतील स्टार फलंदाज डॅरिल मिशेलने भारताविरुद्ध शतक झळकावले. त्याने १२७ चेंडूंचा सामना करत १३० धावा केल्या. त्याच्या खेळीत ९ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. मिशेलने ९० चेंडूत ९३ धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर त्याची गती कमी झाली. त्यानंतर खेळलेल्या ३७ चेंडूत ३७ धावा केल्या आणि केवळ ३ चौकार लगावले.

न्यूझीलंडच्या पराभवाचे हे सर्वात मोठे कारण ठरले, कारण मिशेल सेट फलंदाज होता आणि त्याला शेवटच्या षटकात तुफानी फलंदाजी करणे आवश्यक होते. पण सामन्यात उलटेच पाहायला मिळाले. मिशेलने शेवटपर्यंत फटकेबाजी केली असती तर या सामन्यात किवीजची धावसंख्या ३०० च्या पुढे गेली असती. लक्ष्य ३०० पेक्षा जास्त असल्यास भारतीय संघ अडचणीत येऊ शकत होता.

याशिवाय सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अशा स्थितीत न्यूझीलंडचा संघ ५० षटकांत २७३ धावा करत सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने १२ चेंडू आणि ४ गडी शिल्लक असताना २७४ धावांचे लक्ष्य गाठले आणि विश्वचषकात विक्रमी विजय नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *