महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २० ऑक्टोबर | दिवाळीचा बाजार, आणि लोकांच्या डोळ्यात रुपेरी झळाळी! पण या वर्षी ती झळाळी अंगावर पडतेय की अंग भाजतेय – हेच ओळखू नका! कारण चांदीचा भाव किलोला तब्बल ₹२,३२,८०५ वर पोहोचलाय! हो, ऐकून धक्का बसला ना? पण ही ‘संधी’ आहे की ‘संकट’, हेच आता विश्लेषकांना विचारायला लागतंय.
चार दशकांतील सर्वोच्च पातळीवर चांदीचा जल्लोष सुरू आहे. ऑगस्टपासून नऊ आठवडे सलग तेजी, आणि आता ती जगातली ‘सर्वोत्तम कामगिरी करणारी’ धातू ठरली आहे. मोतीलाल ओसवालच्या अंदाजानुसार, प्रति औंस $५० पार करत चांदी आता $७५ औंसपर्यंत झेप घेऊ शकते — म्हणजे भारतीय बाजारात किलोमागे जवळपास ढाई लाखांचा भाव!
🌪️ ही तेजी का आलीय?
सोन्याप्रमाणे फक्त गुंतवणूक नव्हे, तर चांदीचा औद्योगिक वापरही वाढलाय.
🔹 सौर ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने, सेमीकंडक्टर, ५जी तंत्रज्ञान — सगळीकडे चांदीचाच बोलबाला.
🔹 पुरवठा मात्र खाणीतून कमी — म्हणजे मागणीच्या लाटेत पुरवठा बुडालेला!
🔹 ‘ॲक्सिस एमएफ’च्या अहवालानुसार, २०२६ पर्यंतच उत्पादन स्थिर होईल.
📉 बाजारात ‘कागदी चांदी’चा खेळ
लंडन, न्यूयॉर्क, शांघाय… सगळीकडे ‘चांदी’वर सौदे चालू, पण प्रत्यक्ष धातूचा पुरवठा नाही!
म्हणजे करार आहेत — पण माल कुठे?
विश्लेषक म्हणतात,
“करार संपले आणि डिलिव्हरी मिळाली नाही, तर एक्सचेंजचं डिफॉल्ट होईल!”
हे म्हणजे “साखर विकत घेतली, पण दूकानदाराकडे साखरच नाही!” असा प्रकार!
💣 भारतीय गुंतवणूकदारांमध्ये खळबळ
कोटक, एसबीआय, यूटीआय, आयसीआयसीआय प्रु यांसारख्या मोठ्या म्युच्युअल फंडांनी
“बस्स! आता नवीन गुंतवणूक नको!”
असं स्पष्ट सांगितलंय. कारण त्यांच्या ईटीएफ फंडांना प्रत्यक्ष चांदी घ्यावी लागते, आणि तीच नाही मिळत.
⚠️ धोका कुठे आहे?
एमसीएक्सवर सध्या चांदीचे वायदे किलोमागे १५–२० हजारांच्या अधिमूल्यासह सुरू आहेत.
म्हणजेच बाजारात “किंमत जास्त, पण धातू कमी” — ही विसंगतीच डिफॉल्टचं बीज ठरू शकते.
जर ५ डिसेंबरपर्यंत डिलिव्हरी मिळाली नाही, तर ‘एक्सचेंज डिफॉल्ट’ हा शब्द देशभर झळकू शकतो.
🪙 गुंतवणूकदारांसाठी संदेश:
तज्ज्ञांचे म्हणणे स्पष्ट —
“आता नवीन खरेदी करू नका. पुरवठा आटलेला आहे.”
“ज्यांच्याकडे आधीपासून चांदी आहे, त्यांनी संयम ठेवा. अजून थोडी वाढ शक्य आहे.”
💬
“चांदी घेऊ नका म्हणतोय कारण भाव वाढले म्हणून नव्हे —
तर बाजारात ‘चांदी’ नाही म्हणून!
संकटाला संधी म्हणायचं, की संधीचं संकट झालंय —
ते ठरवायला आता ‘रुपेरी बुद्धी’ लागणार आहे!” 😏