आता निम्म्या किंमतीत मिळणार ज्येष्ठ नागरिकांना एअर इंडियाचे तिकिट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १७ डिसेंबर – आपल्या पैकी अनेकजण विमान प्रवास महाग असल्यामुळे अनेकदा रेल्वे, बस प्रवासाला प्राधान्य देतात. त्याचबरोबर या वाहतुक सेवांमध्ये वयोवृद्धांचे निम्मे तिकिट आकारले जात असले तरीही विमान प्रवासात अशी कोणताही सवलत दिली जात नाही. त्याचबरोबर तिकीटाचे पूर्ण पैसेच द्यावे लागतात. पण आता केंद्र सरकारने देशातील ज्येष्ठ नागरिकांना मोठे गिफ्ट दिले आहे.

आता एअर इंडियाचे तिकिट देशातील कोणत्याही ६० वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकाला निम्म्या किंमतीत मिळणार आहे. बुधवारी याची माहिती विमानोड्डाण मंत्रालयाने दिली आहे. त्याचबरोबर याची माहिती एअर इंडियाच्या वेबसाईटवरही दिलेली आहे. मात्र, यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. एअर इंडियाकडून ही स्कीम या आधीही देण्यात येत होती. पण आता त्याला मंत्रालयाकडून मान्यता देण्यात आली आहे.

अशा आहेत योजनेतील अटी…

* विमानाने प्रवास करणारी ज्येष्ठ नागरिक हा भारतीय नागरिक असायला हवा. भारतात स्थायिक               असलेल्या नागरिकांचे वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असायला हवे.
* इकॉनॉमी केबिनमध्ये बुकिंग श्रेणीच्या मूळ भाड्याचे ५० टक्के.
* भारतात कोणत्याही सेक्टरच्या प्रवासासाठी लागू.
* तिकिट जारी केल्याच्या १ वर्ष मुदतीसाठी लागू.
* प्रवासाच्या सात दिवस आधी बुकिंग करावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *