महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जून । राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नियोजनानुसार होणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय. विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर खरं तर राज्य सरकारने निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली होती. पण निवडणुका पुढे ढकलायला आयोगाने स्पष्ट शब्दात नकार दिलाय.
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसारच या निवडणुका होत असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. दरम्यान या निवडणुका घेण्यावरून भाजप चांगलंच आक्रमक झालाय. निवडणुका पुढे ढकलण्यासाच्या मागणीसाठी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे आज आंदोलन करणार आहेत.