महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ऑगस्ट । भारतीय हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयानं महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवसांसाठीचा हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी राज्यात येत्या चार ते पाच दिवसात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर, पावसानं विश्रांती घेतल्यानं उकाडा वाढल्यानं नागरिक त्रस्त आहेत. तर पावसाचं प्रमाण कमी असलेल्या भागात शेतकऱ्यांसमोर पीक जगवण्याच आव्हान उभं राहिलंय.
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई ने दिलेल्या पूर्वानुमान प्रमाणे, येत्या ४,५ दिवसात राज्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता https://t.co/qTlM44cf8f
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 11, 2021
प्रादेशकि हवामान केंद्र, मुंबई यांनी जारी केलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी माहिती के.एस.होसाळीकर यांनी दिली आहे.