महाराष्ट्र 24 -मुंबई
हार्दिक पांड्या म्हणजे भारतीय संघाचा हुकुमी एक्का आणि क्रिकेट इतिहासातला सर्वोत्तम खेळाडू. दुखापतीमुळे गेले कित्येक महिने क्रिकेटपासून दूर असणारा पांड्या अखेर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघात खेळण्याआधी पांड्या सध्या डीव्हाय पाटील टी-20 लीग खेळत आहे. या स्पर्धेत तीन सामन्यात पांड्याने सलग दोन शतक लगावले आहेत. एवढेच नाही तर त्यानं 26 चेंडूत 144 धावा केल्या. यात 20 षटकारांचा समावेश होता.
हार्दिक पांड्याने डीव्हाय पाटील टी -20 स्पर्धेत आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. यात त्याने पहिल्या सामन्यात 4 षटकारांच्या मदतीने 38 धावा केल्या. यानंतर दुसर्या सामन्यात पांड्याने 10 षटकारांच्या मदतीने 105 धावा फटकावल्या. या सामन्यात त्याने 37 चेंडूत शतक पूर्ण केले. तिसर्या सामन्यात पांड्याने पुन्हा 4 षटकारांसह 46 धावा केल्या. आता चौथ्या सामन्यात त्याने 20 षटकारांच्या मदतीने 158 धावा केल्या. अशाप्रकारे पांड्याने चार सामन्यात 38 षटकारांच्या मदतीने 347 धावा केल्या आहेत.
हार्दिक पांड्याने फलंदाजीने केवळ डीव्हाय पाटील टी -20 स्पर्धेत फलंदाजी आणि गोलंदाजीने तुफान कामगिरी केली आहे. पहिल्या दोन सामन्यात पांड्याने 10 विकेट घेतल्या. पहिल्या सामन्यात पांड्याने 26 धावांत 5 बळी घेतले तर दुसर्या सामन्यात त्याने 26 धावा देऊन 5 बळी घेतले.