विराटला शतक झळकावून उलटली 2 वर्षे:2019 मध्ये कोलकाता कसोटीत झळकावले होते शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ नोव्हेबर । टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटच्या शतकाला सोमवारी दोन वर्षे पूर्ण झाली. या दिवशी म्हणजेच 22 नोव्हेंबर 2019 रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचे शतक झळकावले होते. कोहलीच्या कारकिर्दीतील ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा तो इतका वेळ तिहेरी आकडा गाठू शकला नाही.टीम इंडियाच्या पहिल्या डे-नाईट टेस्टमध्ये विराटने शेवटचे शतक झळकावले होते. बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात त्याने भारताच्या पहिल्या डावात 136 धावा केल्या होत्या. टीम इंडियाने हा सामना एक डाव आणि 46 धावांनी जिंकला होता.

विराट कोहलीने त्याच्या शेवटच्या शतकापासून 12 कसोटी सामने, 15 एकदिवसीय आणि 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या 12 कसोटींमध्ये त्याने केवळ 26.80 च्या सरासरीने 563 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 अर्धशतकांचा समावेश आहे. 15 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 8 अर्धशतकांच्या मदतीने 649 धावा केल्या.

विराटने 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 7 अर्धशतकांच्या मदतीने 777 धावा केल्या आहेत. म्हणजेच यादरम्यान त्याने 20 वेळा अर्धशतकाचा टप्पा ओलांडला, मात्र त्याला एकदाही शतकी खेळीत रूपांतर करता आले नाही.

विराटची शतके थांबल्यापासून इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांनी शतके ठोकली आहेत. विराटच्या शेवटच्या शतकापासून रूट आणि आझम या दोघांनीही 7-7 शतके झळकावली आहेत. या काळात केएल राहुल आणि रोहित शर्मा भारतीय फलंदाजांमध्ये आघाडीवर आहेत. दोघांच्या खात्यात 4-4 शतके आहेत.

न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शतकाचा दुष्काळ संपवण्याची पुढील संधी विराट कोहलीला मिळू शकते. हा सामना 3 ते 7 डिसेंबर दरम्यान मुंबईत खेळवला जाणार आहे. त्याने पहिल्या कसोटी सामन्यासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी-20 मालिकेतूनही बाहेर राहिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *