टपाल व्यवस्थेवरही होतोय एसटी संपाचा मोठा परिणाम; जाणून घ्या नेमकं कारण

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २ जानेवारी । एसटीचे राज्यशासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी एसटीचे कर्मचारी २ नोव्हेंबर पासून बेमुदत कामबंद आंदोलन करीत आहेत. परिणामी एसटीची वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. याचा परिणाम इतर व्यवस्थेसह टपाल व्यवस्थेवर ही झाला आहे. खाजगी वाहनाद्वारे सध्या टपालाची वाहतूक केली जाताना दिसत आहे. यामुळे अनेकांना अवेळी व उशिरा कागदपत्र पोहोचत आहेत.

सध्या व्हॉट्सअप आणि ई-मेलचा जमाना असला तरी महत्त्वाचे आणि शासकीय कागदपत्रे आपल्यापर्यंत पोस्टच पोहोचवत असतो. पोस्टमनची वाट आपण एखाद्या चातकासारखी पाहत असतो. डिजिटल जमान्यात पोस्टमन दुर्लक्षित जरी होत असला तरी त्याची खूप महत्त्व आहे.

राज्यातील टपाल ही एसटीने येत -जात होता एसटी बंद असल्यामुळे नागरिकांना टपाल सेवा इथून दोन वेळेसच मिळत आहे. अनेक महत्त्वाची व नोकरीची कागदपत्रे उशिराने मिळत आहे. यामुळं अनेकांना मुलाखतीची तारीख निघून जात आहे. एसटीचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. तसेच टपाल व्यवस्था आहे कोलमडली असे नागरिकांचे म्हणणे आहे.

अजुनही टपाल सेवा आणि नागरीकांचे अतूट नाते जुळलेले आहे. त्यामुळें अनेकजण शहरी व ग्रामीण भागात पोस्टमन ची आतुरतेने वाट पाहतात. डिजिटल अनेक जण पत्राद्वारे संदेश पाठवण्याचं काम करतात.

सोबतच नागरिकांना खाजगी वाहनातून काही पार्सल पाठवायचे असल्यास अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत, आणि अतिरिक्त पैसे देऊन सुद्धा काही सुरक्षा नसल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे. कारण काही महत्त्वाचे कागदपत्र किंवा वस्तू पाठवल्या तर त्याची सर्वस्वी जबाबदारी कोणाची हा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे. जास्त पैसे देऊनसुद्धा सुरक्षा नसल्याकारणाने मोठा मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. यामुळे बस सेवा केव्हा सुरू होतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *