महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १४ फेब्रुवारी । 14 फेब्रुवारी म्हणजेच आज जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) पुलवामा (Pulwama) हल्ल्याची तिसरी वर्षपूर्ती आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे (CRPF) 40 जवान शहीद झाले होते. मात्र, भारतीय वीरांचे हौतात्म्य व्यर्थ गेले नाही, कारण हल्ल्याच्या 12 दिवसांनंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा बदला घेतला. या कारवाईत पाकिस्तानी भूमीवर कार्यरत असलेले अनेक दहशतवादी तळ हवाई हल्ल्यांद्वारे उद्ध्वस्त करण्यात आले. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे देश आज स्मरण करत आहे. ट्विटरवर सकाळपासूनच #PulwamaAttack आणि #Pulwama_Martyr_Day ट्रेंड करत आहेत. प्रत्येकजण आपापल्या शैलीत शूर आणि शहिदांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. या हल्ल्याला ते विसरले नाहीत आणि माफ करणार नाहीत, असे लोक म्हणतात. तीन वर्षांनंतरही आठवणी ताज्या असून देशवासीय शहिदांचे स्मरण करीत आहे.
वण्डोली है यही¸ यहीं पर
है समाधि सेनापति की।
महातीर्थ की यही वेदिका¸
यही अमर–रेखा स्मृति की।आज यहीं इस सिद्ध पीठ पर
फूल चढ़ाने आया हूँ।
आज यहीं पावन समाधि पर
दीप जलाने आया हूँ।#PulwamaAttack ??? pic.twitter.com/IWkgJZQ5ZB— Swayam Tiwari? (@SwayamTiwari7) February 14, 2022
बलिदानाचे स्मरण
जम्मू-काश्मीरमधील या भ्याड दहशतवादी हल्ल्याची वर्षपूर्ती देशभर साजरी होत आहे. शहीद झालेल्या शूर जवानांच्या बलिदानाचे लोक स्मरण करत आहेत. काहींनी कवितेतून हुतात्म्यांना अभिवादन केले, तर काहींनी व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा देऊन राष्ट्रीय वीरांना आदरांजली वाहिली.
#PulwamaAttack अरे की कट गए कितने सर तुम्हें बचाने में
और तुम प्यारे अभी भी लगे हो इश्क लड़ाने में
अरे इश्क लड़ाने में नहीं है कोई बुराई लेकिन
दो मिनट उनको भी तो याद कर लो भाई तुम
डूब गए जिनके जिंदगी के आशियाने तुम्हें बचाने |
~ AY— Ankit Yadav (@Ankit4People) February 14, 2022
14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून सुमारे 2500 जवानांना घेऊन सीआरपीएफचा 78 बसेसचा ताफा जात होता. हा ताफा पुलवामाला पोहोचला होता तेव्हा समोरून स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्यासोबत जाणाऱ्या वाहनाला धडकली. त्यानंतर मोठा स्फोट झाला. या प्राणघातक हल्ल्यात 40 शूर सीआरपीएफ जवान शहीद झाले.