देशात ऑगस्टपर्यंत 5G सेवा सुरू होण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.६ मे । यूट्यूब किंवा फेसबुकवर व्हिडिओ पाहताना तुम्हालाही बफरिंगचा त्रास होत आहे का? जर उत्तर होय असेल तर लवकरच तुमच्या सर्व समस्या संपणार आहेत. वास्तविक, ऑगस्टच्या अखेरीस ‘5G’ इंटरनेट सेवा भारतातील ग्राहकांना मिळतील, असे गेल्या आठवड्यातच दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे. यासाठी आवश्यक असलेल्या स्पेक्ट्रमची विक्री सुरू झाली असून जूनपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

अशा परिस्थितीत आज जाणून घेऊया G फॉर जनरेशन म्हणजे काय? ‘5G’ लाँच झाल्यानंतर इंटरनेटचा वेग किती असेल? यासोबतच लोकांच्या जीवनावर काय परिणाम होईल? याचीही माहिती तुम्हाला मिळेल.

7.5 लाख कोटी रुपयांच्या स्पेक्ट्रमसाठी मेगा लिलाव

दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 5G इंटरनेट लाँच करण्यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले की, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लिलावाबाबत डिजिटल कम्युनिकेशन समितीची (डीसीसी) बैठक होणार आहे. DCC ही दूरसंचार क्षेत्रातील निर्णय घेणारी सर्वात मोठी संस्था आहे.

अश्विनी वैष्णव म्हणाले की, विभाग ट्रायच्या शिफारशींची वाट पाहत आहे. वैष्णव यांनी असेही सांगितले की, ट्रायने सरकारला 1 लाख मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमचा 7.5 लाख कोटी रुपयांना लिलाव करण्याची शिफारस केली होती. त्याची वैधता 30 वर्षे असेल. शासनस्तरावर ही प्रक्रिया सुरू झाली आहे. लिलाव संपल्यावर, 5G लाँच केले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *