महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । सलमान मुल्ला । दि. ७ मे । कळंब । औरंगाबाद येथील मातंग समाजाच्या मनिष आव्हाड या युवकाला सात ते आठ जनांच्या जमावाने लाडकी दांडक्याने मारहाण करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे तरी हा खटला जलदगती न्यायालयात चालवून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच पीडित कुटुंबाला पंचवीस लाखाची मदत करून मयत मनोज आव्हाड यांच्या पत्नीस शासकीय नौकरीत सामावून घ्यावे व सदर गुन्हात ३६३,१२०ब,२०१ तसेच संघटीत गुन्हेगारी कायदा (मोका) या कलमांची वाढ होण्याच्या मागणीसाठी आज दिनांक ४ मे रोजी लहुजी शक्ती सेना कळंब तालुका व ऊस्मानाबाद जिल्हयाच्या वतीने उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय समोर औरंगाबाद हत्याकांडातील आरोपींच्या प्रतिकारात्मक पुतळ्यास फासावर लटकावून तिव्र निदर्शने करण्यात आली या वेळी लहुजी शक्ती सेनेचे दिगवंत प्रदेशअध्यक्ष सोमनाथभाऊ कांबळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमीत्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले,यावेळी आरोपींना फाशी झालीच पाहिजे या घोषणानी परीसर दणानुन गेला होता .
यावेळी लहुजी शक्ति सेनेचे ऊस्मानाबाद जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड,कोअर कमिटी जिल्हाध्यक्ष बालाजी गायकवाड, कळंब तालुकाध्यक्ष पांडुरंग कदम,जिल्हा उपाध्यक्ष मारूती क्षिरसागर,यूवक जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ साठे,जिल्हा ऊपाध्यक्ष विजय क्षिरसागर, जेष्ठ नेते रामकृष्ण कांबळे,कळंब तालुका प्रसिद्धि प्रमुख विकास गायकवाड, तुळजापूर महिला तालुकाध्यक्ष लक्ष्मी गायकवाड, जिल्हा संघटक हरीभाऊ क्षिरसागर,कळंब तालुका संघटक विठ्ठल ताटे,कळंब तालुका उपाध्यक्ष शंकर लोंढे,भुम शहर अध्यक्ष अनुरथ कसबे,राजाभाऊ साठे,बार्शी शहराध्यक्ष प्रशांत काळे,सर्कल प्रमुख अनिल सिरसट,रनजित पाटोळे,भारत सिरसाट,श्रषिकेश भिसे,सागर सिरसट,किरन गायकवाड, भिमा गायकवाड, प्रदीप गायकवाड, किशोर जाधव,अक्षय सिरसट आदी शेकडो समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.