महाराष्ट्र २४- ऑनलाईन – मुंबई : कोरोनाचे संकट असताना एक दिलासा देणारी बातमी हाती आली आहे. राज्यातल्या लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यात गेल्या १४ दिवसांपासून एकही नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. देशात असे एकूण ६१ जिल्हे असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.
▪️ No fresh case reported in 61 more districts from 23 States/UTs during the last 14 days
▪️ COVID India Seva platform launched to engage citizens on #COVID19
Check out PIB's daily COVID-19 bulletin for more
👉 https://t.co/qeIgeq7qsU@MoHFW_INDIA @COVIDNewsByMIB pic.twitter.com/ANhu2zzpxa
— PIB India #StayHome #StaySafe (@PIB_India) April 21, 2020
राज्यात काल आणखी ५५२ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. राज्यातला एकूण रुग्णांचा आकडा ५ हजार २१८ झाला आहे. यापैकी ७७२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर ५२१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९९ हजार ५६९ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ७ हजार ८०८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.