ऋषी कपूर यांच्या निधनाबाबत राजकीय नेत्यांनी व्यक्त केला शोक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – । विशेष प्रतिनिधी । मुंबई : ज्येष्ठ सदाबहार अभिनेते ऋषी कपूर यांचे कर्करोगाने आज मुंबईत निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना काल त्यांना सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली. अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनावर देशातील राजकीय नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. ऋषी कपूर हे प्रतिभेचे पॉवरहाउस होते अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या जाण्याने आपल्याला अतीव दु:ख झाल्याचे मोदी म्हणाले.

जेष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीही ऋषी कपूर यांच्या निधनाबाबत शोक व्य्क्त केला आहे. ते करिष्मा असलेले अभिनेते होते. चित्रपटसृष्टीने एक अष्टपैलू अभिनेता गमावला आहे, असे पवार यांनी म्हटले आहे.

हा आठवडा भारतीय चित्रपटसृष्टीसाठी भयंकर असा आहे. ऋषी कपूर हे उत्कृष्ट अभिनेते होते. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *