महाराष्ट्र २४ ऑनलाईन – । विशेष प्रतिनिधी । मुंबई : कोरोनाचे संकट आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असताना राज्य सरकारच्या नियमाना हरताळ फासण्यात येत आहे. कोरोनाचा धोका असताना लोक घराबाहेर पडताना दिसत आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत लॉकडाऊन आणि संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ८३ हजार नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच धक्कादायक बाब म्हणजे सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांवर हल्ला होण्याचे प्रकार वाढत आहेत. आतापर्यंत पोलिसांवर हल्ला केल्याच्या १६५ घटनांची नोंद करण्यात आली आहे.
#Lockdown च्या काळात पोलिसांनी केलेली कारवाई 👇
✅राज्यात कलम १८८ नुसार ८३ हजार १५६ गुन्हे दाखल
✅१६ हजार ८९७ व्यक्तींना अटक.
✅अवैध वाहतूक करणाऱ्या १११४ वाहनांवर गुन्हे
✅४९ हजार ८०२ वाहने जप्त
✅परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनाच्या १५ गुन्ह्यांची नोंद pic.twitter.com/ihJeQg4A5D— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 29, 2020
लॉकडाऊनच्या काळात २२ मार्च ते २८ एप्रिल या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ८३,१५६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १६,८९७ व्यक्तींना अटक करण्यात आली. तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी २ कोटी ९४ लाख ६६ हजार ६९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला, अशी माहिती पोलीस विभागाच्या प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.