कळंब:-मांजरा धरणामध्ये 72 टक्के पाण्याचा साठा ,पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला..

Spread the love

Loading

 

महाराष्ट्र 24 ! जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला*

कळंब:-याबाबत सविस्तर माहिती अशी की बीड, उस्मानाबाद, लातूर या तीन जिल्ह्यातल्या अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणामध्ये 72 टक्के इतका पाण्याचा साठा जमा झाला आहे.

यामुळेच उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून या धरणामध्ये आणखी पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. केज तालुक्यात सर्वाधिक मोठं असलेल्या मांजरा धरणामध्ये 72 टक्के पाण्याचा साठा जमा झाला आहे..

काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे मांजरा नदीला चांगले पाणी आल्याने धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.

बीड, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांना येथून पाणीपुरवठा केला जातो तसेच केज, धारूरसह बारा गावांना पाणीपुरवठा होत असल्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला त्याचबरोबर परिसरातील शेतकऱ्यांना या धरणातून चांगला फायदा हाते असतो.

मांजरा धरण हे सलग तीन वर्षे हे धरण भरत आलेलं आहे.यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *