केंद्र व राज्य शासन लघु उद्योगांसाठी मोठ्या पॅकजची घोषणा करेल ; उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला विश्वास

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – : लघु उद्योग क्षेत्र हे उद्योगांचा कणा आहे. परंतू, कोरोनामुळे हे क्षेत्र संकटात सापडले आहे. लघु उद्योगांना खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयुष गोयल यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच केंद्र व राज्य शासन लघु उद्योगांसाठी मोठ्या पॅकजची घोषणा करेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. यंगीस्थान फेसबुक ग्रुपच्यावतीने आयोजित बिझनेस टॉक या कार्यक्रमात देसाई बोलत होते.

यावेळी देसाई म्हणाले की, सध्या उद्योग क्षेत्र मोठ्या आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहोत. दीड महिन्यांपासून राज्यातील बहुतांश उद्योग ठप्प आहेत. कोरोनाचे आव्हान अद्याप संपलेले नाही. परंतु या संकटातून बाहेर पडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सध्या १५ हजारांहून अधिक उद्योग सुरू झाले आहेत. तीन लाख कामगार कामावर येत आहेत. उद्योग सुरू करताना कामगारांच्या वाहतुकीसाठी दुचाकींना परवानगी दिलेली आहे. उद्योगचक्र हळुहळु पूर्वपदावर येत आहे.

मुंबईमध्ये करोनाचा अधिक प्रादुर्भाव आहे. तरीही निर्यात केंद्रीत उद्योगांना आम्ही परवानगी दिली आहे. शेती क्षेत्राला अडचण होऊ नये यासाठी कृषी साहित्याची निर्मिती करणाऱ्यांना परवानगी दिली आहे. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. उद्योगांना या आव्हानात्मक परिस्थितीत काही सवलती देता येतील का, यावर उद्योग विभाग काम करत आहोत.

लघु उद्योगांना सावरण्यासाठी लवकरच राज्य व केंद्र शासन पॅकेजची घोषणा करणार आहे. राज्य शासनाचा उद्योग विभाग त्यावर काम करत आहे. याशिवाय लघु उद्योगांचे वीजेचे फिक्स चार्जेस स्थगित केले आहेत. जेवढा वीज वापर होईल, तेवढेच दर आकारले जातील. शासनाचे उद्योगांसाठी असलेले प्रोत्सहने कामय ठेवले जातील. उलट गरज पडेल तिथे प्रोत्सहन दिले जाईल. उद्योगचक्र गतीमान करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असेही देसाई म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *