रेल्वेने नियमित प्रवास करता तर ‘ही’ माहिती असायलाच हवी…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २० जानेवारी । भारतातील अनेक लोक दररोज भारतीय रेल्वेने प्रवास करतात. लोक हे कामासाठी किंवा नातेवाईकांना भेटण्यासाठी ट्रेनने प्रवास करत असतात. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वे ही अनेकांची पहिली पसंती आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे सर्वसामान्यांना त्यात प्रवास करण्यासाठी फारसा त्रास सहन करावा लागत नाही. यासोबतच हा प्रवास स्वस्त आणि सोयीचा आहे. लोक नेहमीच ट्रेन पकडण्यासाठी वेळेपूर्वी स्टेशनवर पोहोचतात. परंतु अनेकदा काही कारणांमुळे त्यांची ट्रेन मिस होते. अशा वेळी त्यांचे सीट कोणाला दिले जाते का? याविषयीच आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

याचे उत्तर होय आणि नाही असे दोन्ही आहे. तुमची ट्रेन चुकली असेल तर तुमची सीट दुसऱ्याला देण्याचा अधिकार TTE ला आहे. मात्र, तुम्ही या जागेवर दावा करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की पुढचे स्टेशन फार दूर नाही आणि तुम्ही इतर कोणत्याही मार्गाने ट्रेनच्या आधी तिथे पोहोचू शकता, तर तुम्ही तिथे जाऊन तुमच्या सीटचा दावा करू शकता. कन्फर्म तिकिटावर रेल्वे तुमची सीट पुढील 2 स्टेशनसाठी आरक्षित ठेवते. मात्र, त्यानंतर टीटीई तुमची सीट दुसऱ्या वेटिंग तिकीट प्रवाशाला देऊ शकते.

हे देखील करता येईल
या नियमाचा आणखी एक फायदा म्हणजे तुमची सीट मिळण्याची शक्यता वाढते. आता तुम्ही विचार कराल की हे कसे होईल? समजा, ज्या स्थानकावरून तुम्हाला ट्रेन पकडायची आहे, त्या स्थानकासाठी ट्रेनमध्ये सीट उपलब्ध नाही, परंतु ज्या स्थानकावरून ट्रेन सुरू होत आहे तिथून तुम्हाला कंफर्म सीट मिळत आहे. जर सुरुवातीचे स्टेशन तुमच्यापासून फक्त 2 स्टेशनच्या मागे असेल, तर तिथून तिकीट बुक करा आणि मग तुमच्या स्टेशनवरून ट्रेन पकडा.

अर्धे पैसे मिळतील
तरीही तुमची ट्रेन चुकली तर तुम्ही तिकिटाच्या बेस प्राइसच्या अर्ध्या रकमेचा दावा करू शकता. तुम्ही तुमचे तिकीट रद्द केल्यास आणि सुरुवातीच्या स्टेशनवरून ट्रेन सुटल्यानंतर 3 तासांनंतर TDR दाखल केल्यास तुम्हाला अर्धी रक्कम परत मिळेल. रेल्वेने आपल्या प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेऊन असे नियम केले आहेत. त्यांच्याबद्दल योग्य माहिती असल्यास तुम्ही त्यांचा लाभ घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *