बारावी गणित पेपरफूट प्रकरण, तपास आता एसआयटीकडे; आरोपींची संख्या सातवर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०७ मार्च । बुलढाणा : जिल्ह्यात बारावीच्या गणिताचा पेपर फुटल्याने शिक्षण यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगल्या गेलीय. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. बारावी गणित पेपरफुटीच्या प्रकरणात आता विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. रविवारी पकडलेल्या दोन्ही आरोपी शिक्षकांना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या आरोपींना देऊळगावराजा न्यायालयात हजर करण्यात आले होते. आतापर्यंत या प्रकरणात आरोपींची संख्या सातवर गेली आहे. एसआयटीचे हे पथक मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करणार आहे.

राज्यभरात गाजलेल्या इयत्ता बारावीचा गणित पेपर सोशल मीडियाद्वारे फुटल्याची घटना तीन मार्च रोजी सिंदखेड राजा तालुक्यात घडली. तो पेपर ही सोशल मीडियावर व्हायरल झाला. पेपर फुटल्याचे प्रकरणं विधिमंडळांत सुद्धा चर्चिल्या गेले. यातून हा प्रकार संपूर्ण राज्यभरात चर्चेत आला होता. शिक्षण विभागाने पोलिसांत तक्रार दिल्यावर चौकशी करण्यात आली. गणिताचा पेपर फोडण्यात आला. या प्रकरणी काही आरोपींना अटकही झाली. हे प्रकरण उघडकीस आले म्हणून माहीत झाले. आता एसआयटी तपास करणार असल्यानं दोषींवर कारवाई निश्चित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

खाजगी संस्थाचालक असलेले शिक्षक गजानन आडे, गोपाल शिंगणे यांच्यासह गणेश पालवे, पवन नागरे आणि गणेश नागरे या पाच जणांना आरोपी ठरवत अटक करण्यात आली. या पाचही आरोपींना देऊळगावराजा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे सर्व होत असतानाच उशिरा लोणार येथील शाळेवर कार्यरत असलेल्या शेख अकील शेख मुनाफ आणि अंकुश पवार या दोघांना रात्री अटक करण्यात आली. त्यामुळे आता या प्रकरणात आरोपींची संख्या सात झालीय. त्यानंतर आता तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *