Salman Khan: ‘जे व्हायचे ते होईलच…’, Salman Khan स्पष्टच बोलला

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ मार्च । गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सलमानला बिश्नोई गँगकडून धमकीचा ईमेल आला आहे. या धमकीनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमानला मिळणाऱ्या सततच्या धमक्यांमुळे त्याचे कुटुंब, मित्र आणि चाहतेही चिंतेत आहेत. मात्र, सल्लू भाईला या धमक्यांची अजिबात चिंता नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कुटुंबातील एका जवळच्या सदस्याने खुलासा केला की, ‘सलमान या धमक्या अत्यंत हलक्यात घेत आहे किंवा कदाचित कुटुंबियांना त्रास होऊ नये म्हणून तो असे दाखवत आहे. सलमान खानचे कुटुंबीयदेखील सध्या शांत असून, कुणीही याबाबत चर्चा करत नाहीये. सलीम साहब (सलमानचे वडील सलीम खान) देखील खूप शांत राहत आहेत.

सलमान सुरक्षेच्या विरोधात
सलमानच्या कौटुंबिक मित्राचे म्हणणे आहे की, या धमकीनंतर सलमान खान कडक सुरक्षेच्या विरोधात होता. सलमानला असे वाटते की, तो धमकीकडे जितके जास्त लक्ष देईल, तितके धमकी देणाऱ्यांना वाटेल की, ते यशस्वी झाले आहेत. याशिवाय सलमानला जीवाची पर्वा नाही. तो म्हणतो, जे व्हायचे ते होईल. पण, कौटुंबिक दबावामुळे त्याने त्याच्या “किसी का भाई किसी की जान” चित्रपटाच्या पोस्ट-प्रॉडक्शन कार्याव्यतिरिक्त इतर सर्व आउटिंग कमी केले आहे.

सलमानला अनेकदा धमक्या
सलमान खानला काळवीट प्रकरणाबाबत बिश्नोई टोळीकडून अनेकदा धमक्या आल्या आहेत. अलीकडेच लॉरेन्स बिश्नोईने तुरुंगातून दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले होते की, सलमान खानला मारणे हाच त्याचा उद्देश आहे. तो म्हणाला होता की, लहानपणापासूनच सलमान खानबद्दल त्याच्या मनात राग आहे. सलमानने आपल्या बिकानेर येथील मंदिरात जाऊन आपल्या समाजाची माफी मागावी, अन्यथा परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहावे, असेही बिष्णोई म्हणाले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *