महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ९ एप्रिल । बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन आज आपला ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. जया नेहमीच आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबत खाजगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत राहिल्या आहेत.’जंजीर’ या सिनेमात एकत्र काम केल्यानंतर अवघ्या एकच महिन्यात अमिताभ आणि जयांनी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या तीनच वर्षांत या दोघांमध्ये रेखांची एन्ट्री झाली होती.’दो अनजाने’ या सिनेमात रेखा-अमिताभ यांनी पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. या सिनेमांनंतर त्यांची जोडी पडद्यावर लोकप्रिय ठरली.पण त्यांनतर अमिताभ आणि रेखाच्या अफेयर्सच्या चर्चा प्रचंड गाजल्या होत्या. अशातच यश चोप्रांनी अमिताभ-जया-रेखा या तिघांना ‘सिलसिला’मध्ये कास्ट केलं होतं.
हा सिनेमा या तिघांच्या खऱ्या आयुष्यावरच आधारित असल्याचं आजही सर्वांना वाटतं. या सिनेमानंतर जया बच्चन यांनासुद्धा रेखा आणि अमिताभ यांच्या नात्याची भनक लागली होती.जया फक्त एका संधीच्या शोधात होत्या. अमिताभ एकदा बाहेर शूटिंगसाठी गेल्या नंतर जयांना ती संधी मिळाली होती. ही संधी साधून जयांनी रेखा यांना जेवायला घरी बोलावलं.रेखा घाबरतच जयाकडे जेवायला पोहोचल्या. असं म्हटलं जातं की, या दोघींमध्ये सुरुवातीला अगदी मैत्रिणींसारख्या गप्पा झाल्या.
पण जेव्हा रेखा घरातून जायला निघाल्या तेव्हा जयांनी रेखांना म्हटलं,’काहीही झालं तरी मी अमितला सोडणार नाही’ हे यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. आणि या दिवसांनंतर रेखानी अमिताभपासून दूर राहणं सुरु केलं होतं.