High Blood Pressure : ही लक्षणे दिसल्यास वेळीच व्हा सावध ; मीठाच्या अतिरेकामुळे वाढतो उच्च रक्तदाब त्रास

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ मे । सध्याच्या काळातील गंभीर आरोग्य समस्यांपैकी एक उच्च रक्तदाबाची समस्या आहे. रक्तदाब सामान्य असण्यापासून वारंवार वाढणे हृदयरोग, मज्जातंतूंसाठी समस्या वाढवणारे असू शकते. उच्च रक्तदाब झाल्यास, हृदयविकाराच्या झटक्यापासून स्ट्रोकपर्यंतच्या समस्यांचा धोका असू शकतो.

जीवनशैली आणि आहार योग्य ठेवल्यास रक्तदाबाचा त्रास कमी करता येऊ शकतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी अन्नामध्ये सोडियमचे प्रमाण कमी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

याबाबत आरोग्य (Health) तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे की बहुतेक लोक नियमित प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात सेवन करत आहेत. आपल्या आहारातील सोडियमचा मुख्य स्त्रोत मीठ आहे. त्याचा अतिरेक रक्तदाबाशी संबंधित समस्या वाढवू शकतो. निरोगी व्यक्तीने एका दिवसात 2300 मिलीग्रामपेक्षा जास्त मीठ खाऊ नये, तर जे रक्तदाब रुग्ण असतील त्यांच्यासाठी हे प्रमाण 1500 मिलीग्राम असू शकते.

1. आरोग्य तज्ज्ञ काय म्हणतात?

वेबएमडीच्या अहवालात, आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे की सरासरी अमेरिकन दिवसाला 3,400 मिलीग्रामपेक्षा जास्त मीठाचे सेवन करतात. जगातील (World) इतर अनेक देशांमध्येही हीच परिस्थिती आहे. दीर्घकाळापर्यंत जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब होऊ शकतो आणि त्यामुळे स्ट्रोक – एक जीवघेणा हृदयरोग होऊ शकतो.

High Blood Pressure
Diabetes And High Blood Pressure Guidelines : मधुमेह व उच्च रक्तदाबापासून लांब राहायचे आहे ? Who च्या ‘या’ नियमांना नेहमी ठेवा लक्षात !
खाद्यपदार्थात मीठाव्यतिरिक्त ते पॅकबंद चिप्स, जंक आणि फास्ट फूडमध्येही मुबलक प्रमाणात आढळते. पण तुम्ही जास्त मीठ खात आहात हे कसे कळेल? त्यामुळे शरीरावर कसा परिणाम होतो हे जाणून घेऊया

2. पोट फुगणे

जास्त मीठ खाल्ल्याने पोटाचे (Stomach) विकार जडतात. ओटीपोटात सतत जडपणा. तसेच, सोडियमचे प्रमाण कमी केल्यावर ही समस्या देखील कमी होऊ शकते. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, केवळ खारट असलेल्या पदार्थांमध्येच सोडियमचे प्रमाण जास्त असेल असे नाही. सँडविच, पिझ्झा आणि कॅन केलेला सूपमध्येही मीठ जास्त असू शकते.

3. वारंवार तहान लागण्याची समस्या
उच्च सोडियमसह इतर अनेक आरोग्य समस्यांमध्ये वारंवार तहान लागू शकते. जर तुम्हाला वारंवार तहान लागण्याची समस्या येत असेल तर सोडियमचे प्रमाण कमी करण्याकडे नक्कीच लक्ष द्या. जास्त प्रमाणात सोडियममुळे डिहायड्रेट होतो. तुमचे शरीर पेशींमधून पाणी काढते ज्यामुळे तुम्हाला खूप तहान लागते.

4. झोपेची समस्या
जर तुम्ही झोपण्यापूर्वी जास्त मीठ खाल्ल्यास तुमच्या झोपेचा त्रास होऊ शकतो. शरीरात सोडियमचे प्रमाण अधिक असल्याने अस्वस्थता, रात्री वारंवार जागरण यासारख्या समस्या उद्भवतात. याशिवाय आरोग्य तज्ज्ञांना असे आढळून आले की, शरीरात मिठाचे प्रमाण जास्त असल्याने रक्तदाब वाढू लागतो, त्यामुळे झोपेची समस्या निर्माण होतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *