राज्यात 86 हजार 575 कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी परतले, आरोग्यमंत्र्यांनी राजेश टोपेंनी दिली माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – राज्यात आज कोरोनाच्या 5493 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 70 हजार 607 रुग्णांवर ( अक्टिव्ह ) उपचार सुरू आहेत. आज 2330 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या 86 हजार 575 झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 52.59 टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 9 लाख 23 हजार 502 नमुन्यांपैकी 1 लाख 64 हजार 626 नमुने पॉझिटिव्ह (17.82 टक्के) आले आहेत. राज्यात 5 लाख 70 हजार 475 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 37 हजार 750 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज 156 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी 60 मृत्यू मागील 48 तासांमधील तर उर्वरित 96 मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 4.51 टक्के एवढा आहे.

मागील 48 तासात झालेले 60 मृत्यू हे मुंबई मनपा-23, ठाणे मनपा-2, नाशिक-3, नाशिक मनपा-5, पुणे मनपा-20, सोलापूर मनपा-4, सांगली-1, रत्नागिरी-1. या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *