महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जुन ।। आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. देहूतून २.३० वाजता पालखी हलणार आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी ओढण्याचा मान यंदा पुण्यातील खडकवासला येथील गुलाब अन् मल्हार या बैलजोडीला मिळाला आहे.
यंदा तुकाराम महाराजांची पालखी ओढण्याचा मान नांदेड सिटी येथील निखिल कोरडे या कुटुंबातील बैलांना मिळाला आहे. यंदा पालखीचा रथ ओढण्यासाठी संस्थानकडे 27 अर्ज आले होते. त्यापैकी यांच्या बैलजोडींची निवड झाली आहे. (Ashadhi Wari 2024)
खिलार जातीची ही बैलं असून ती कर्नाटकातून आणली आहेत. गेली सात वर्ष कोरडे कुटुंबिय या बैलांचे संगोपन करत आहेत.
कशी होते बैलजोडीची निवड
तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये पुणे जिल्ह्यामधील कोणतेही कुटुंब पालखी रथाच्या बैलजोडीचा मानासाठी अर्ज भरू शकतात. यामध्ये रीतसर अर्ज भरून संस्था आणि डॉक्टरांची टीम योग्य अशा खिल्लार बैलांची निवड करतात.
दरवर्षी २ वेगवगेळ्या कुटुंबाला हा मान दिला जातो. दोन कुटुंबाला मान दिल्या मुळे याचा फायदा खिल्लार बैलांना असा होतो कि, पहिल्या दिवशी एका कुटुंबाची बैल पालखी रथ ओढतात आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कुटुंबाची बैल रथ ओढतात, त्यामुळे पहिल्या दिवशीच्या बैलजोडीला एक दिवसाचा पूर्ण आराम मिळतो.
बैलजोडी निवडल्यानंतर दिला जातो विशेष व्यायाम
संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा महिनाभराचा असतो. बैलांना सतत चालावं लागतं. रथ ओढावा लागतो.
बैलांना लोकांमध्ये, गर्दीत चालण्याची लोकांमध्ये चालण्याची सवय व्हावी यासाठी त्याला माणसांत नेलं जातं. तसेच, रथ ओढण्याची ताकद यावी यासाठी खुराक आणि त्यांचा व्यायाम त्यांना तो रोजच्या रोज करून घेतला जातो.