![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ जुलै ।। जुलै महिना संपताच सणवाराला सुरुवात होते. विशेष म्हणजे श्रावण महिना महत्त्वाचा मानला जातो. सगळेचजण श्रावणाची अगदी आतुरतेने वाट पाहतात. उत्तर भारतीयांच्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. तर, महाराष्ट्रात दक्षिण भारतीय पंचांगानुसार 05 ऑगस्ट 2024 पासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. (green leafy vegetables and curd not eat in shravan month know all scientific and religious reasons )
या महिन्यात आहार घेताना अनेक गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. श्रावण महिन्यात अनेकजण उपवास करतात. यावेळी दह्याचे सेवन केलं जातं. पण आयुर्वेदानुसार, श्रावण महिन्यात दह्याचे सेवन करणं चुकिचं म्हटलं आहे. तसेच काही भाज्यादेखील खाणं टाळलं पाहिजे असंही त्यामध्ये सांगितलं आहे.
असं सांगण्यामागे वैज्ञानिक कारणदेखील आहे.
लोकांना या महिन्यात मांसाहार आणि कांदा-लसूण टाळून सात्विक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. या सर्वांचा त्याग करण्याबरोबरच श्रावणात पालेभाज्या, दही आणि मोहरिची भाजी यांचा त्याग करावा असेही शास्त्रात सांगितले आहे. यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, श्रावणात दही, दूध आणि भाज्या का खाऊ नये.
धार्मिक कारण काय आहे?
असे मानले जाते की, सात्विक अन्न खाल्ल्याने पवित्रता आणि अध्यात्म वाढते. सात्विक अन्न ताजे आणि हलके असते. दही पालेभाज्या, पौष्टिक आहेत परंतु ते त्याची तयार करण्याची पद्धत ही सात्विक नसते.
याशिवाय असा दावा केला जातो की भगवान शिवाला निसर्ग आणि नैसर्गिक गोष्टी खूप आवडतात. त्यानंतरच भांगाच्या पानांपासून ते बेलच्या पानांपर्यंत सर्व काही त्यांना अर्पण केले जाते.
शिवलिंगाला दूध आणि दह्याने अभिषेक केला जातो. अशा परिस्थितीत आपण ज्या वस्तूंसह भगवान शंकराची पूजा करतो, त्यांचे सेवन करणे चुकीचे असल्याचे पंडितांचे म्हणणे आहे. त्यामुळं श्रावणामध्ये भाज्या, दूध, दही यांचे सेवन करू नये.
वैज्ञानिक कारण काय आहे?
श्रावण महिन्यात पाऊस असतो. जीव-जंतू, विषाणू व कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो. आपल्याला माहीत आहे की दही बॅक्टेरियापासून बनते. दह्यात तामसी गुण असतात, त्यामुळे ते पावसाळ्यात खाणे टाळले जाते.
आयुर्वेदानुसार तामसी आहारामुळे (अति तिखट, मांसाहारी) आळस, सुस्ती येऊ शकते. याशिवाय दही खाल्ल्याने सर्दी, खोकला यांसारख्या समस्याही होऊ शकतात. त्यामुळे भक्तांच्या अध्यात्म अभ्यासात अडथळे येतात.
पालेभाज्यांमध्येही कीटक असतात, त्यामुळे पानं दूषित होतात. ही पानं जनावरे खातात जे आपल्याला दूध देतात. त्यामुळे श्रावण महिन्यात दूध, पनीर, दही अशा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.

