महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जुलै ।। पावसाळ्यात योग्य आहार घेणे गरजेचे असते. कारण यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. पोषक आहारांमध्ये व्हिटॅमिन सी,डी, प्रथिने आणि कॅल्शिअम असते. शरीरात या घटकांसह फायबरची आवश्यकता असते. फायबरमुळे पचनक्रिया सुरळित कार्य करते. फायबर फळे,भाज्या,कडदान्य आणि तेलबीयांमध्ये मुबलक प्रमाणात असते. शरीरात फायबरची कमरता असलयास कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवतात हे जाणून घेऊया.
फायबर महत्वाचे का आहे?
फायबरमुळे पचनसंस्था सुरळित कार्य करते. तसेच रक्तातील साखर आणि कोलेस्टॉल सारख्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास देखील मदक करू शकते. आरोग्यतज्ज्ञांच्या मते पचनक्रिया सुरळित ठेवायची असेल तर आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे.
मधुमेहाचा धोका
शरीरात फायबरची कमतरता असेल तर पचनशक्ती मंदावते आणि यामुळे मधुमेहाचा धोका निर्माण होतो. कारण फायबर रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करते.
पोटासंबंधित आजार वाढू शकतात
शरीरात फायबरची कमतरता असेल तर पोटासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. जसे की फायबरची कमतरता असल्याने पोट फुगणे, गॅस आणि अपचन यासारख्या समस्या निर्माण होतात. दीर्घकालीन फायबरच्या कमतरतेमुळे मोठ्या आतड्यांमध्ये समस्या निर्माण होऊ शकते. बद्धकोष्ठतेची समस्या संपूर्ण पचनसंस्थेसाठी समस्या वाढवते.
पुढील पदार्थांचे करावे सेवन
रोजच्या आहारा हंगामी फळ आणि भाज्यांचा समावेश करावा. यामुळे शरीरातील फायबरची कमतरता कमी होते. सफरचंद, नाशपाती, ब्रोकोली, गाजर आणि पालक यासारख्या पदार्थांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. तसेच तपकिरी तांदूळ, गहू आणि ओट्सचा आपल्या आहारात समावेश करावा. आहारात बदाम, काजू यासारख्या सुकामेव्यांचा आहारात समावेश करावा. रोज पुरेशा प्रमाणात पाणी पिणे देखील गरजेचे आहे कारण ते फायबरला पचण्यास मदत करते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.