१२वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ ऑगस्ट ।। कर्मचारी निवड आयोगाद्वारे भरती जाहीर करण्यात आली आहे. कर्मचारी निवड आयोगाद्वारे ग्रेड C आणि ग्रेड B पदांसाठी भरती जाहीर केली आहे. जवळपास २००६ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी नोकरीसाठी अर्ज करावेत.

१२ वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. भारत सरकारद्वारे ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीची जाहीर कर्मचारी निवड आयोगाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १२ वी पास असणे गरजेचे आहे.या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. १८ ते ३० वर्षातील उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.

१७ ऑगस्ट २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या नोकरीसाठी तुम्हाला परीक्षा द्यावी लागणार आहे.यासाठी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. या परीक्षेत पास झाल्यानंतरच तुमची निवड करण्यात येईल.

जर तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल तर नॅशनल बँकेत सध्या भरती सुरु आहे. लिपिक पदे ते ऑफिसर अशा अनेक पोस्टसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेत पास झाल्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *