महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ ऑगस्ट ।।केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या (Rajya Sabha Elections) १२ रिक्त जागांच्या निवडणुकीची अधिसूचना जारी केली आहे. यासाठी ३ सप्टेंबर रोजी मतदान होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी निकाल जाहीर होईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २६ आणि २७ ऑगस्ट आहे. राज्यसभेच्या १२ रिक्त जागांमध्ये आसाम २, बिहार २, महाराष्ट्र २ तसेच हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, त्रिपुरा, तेलंगणा, ओडिशा येथील प्रत्येकी १ जागेचा समावेश आहे.
Election Commission of India releases notification for the 12 vacant seats of Rajya Sabha. Elections will be held on 3rd September. The last date for withdrawal of nominations is the 26th and 27th of August. pic.twitter.com/1d3SgWivOT
— ANI (@ANI) August 7, 2024
महाराष्ट्रातून छत्रपती उदयनराजे भोसले आणि केंद्रीय मंत्री पियूष गोयल लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यांच्या जागेवर आता पोटनिवडणूक होणार आहे. मध्य प्रदेशातून ज्योतिरादित्य शिंदे, राजस्थानातून के. सी. वेणूगोपाल देखील सध्या लोकसभा खासदार बनले आहेत. त्यामुळे त्यांची राज्यसभेची जागा रिक्त आहे. सर्बानंद सोनोवाल यांच्यासह एकूण १० विद्यमान सदस्य लोकसभेवर निवडून गेल्याने दहा जागा रिक्त झाल्या आहेत. दोन सदस्यांनी राजीनामे दिल्याने त्यांच्या जागा रिक्त झाल्या होत्या.