( औरंगाबाद ) संभाजीनगर कोरोनाचे प्रभूत्व रोखण्यासाठी आढावा बैठक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – संभाजीनगर – ता. २६ जुलै – जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाचा मा. पालकमंत्री श्री. सुभाष देसाई व आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज आढावा घेतला.

कोरोना विषाणूच्या संकटावर मात करायची असेल तर सर्वांनी एकत्र लढले पाहिजे. देशातील साधारण पाच-सहा राज्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसत आहे, त्यापैकी महाराष्ट्र राज्य महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, कल्याण, डोंबिवली, संभाजीनगर या भागातील परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे.

कोरोना लॉकडाऊन काळात स्थानिक लोकांनी अनेक सण साधेपणाने साजरे करून सर्व समाजाला एक उत्तम उदाहरण दिले आहे. प्रादुर्भावाचा डबलिंग रेट हा १४ दिवसांवरून ३० दिवसांवर जाणे ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे इथली परिस्थिती सुधारण्यासठी स्थानिकांची नक्कीच मदत मिळेल, असा विश्वास वाटतो.

या संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी इतकेच नाही तर खुद्द मुख्यमंत्र्यांनीही यात जबाबदारीने लक्ष घातलं आहे. मात्र लोकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. ज्या सूचना सरकार करत आहे त्याचे काटेकोर पालन जनतेकडून होताना दिसत आहे.

खासगी डॉक्टर रुग्णसेवा देण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यासाठी जिल्ह्याच्या यंत्रणेला डिझॅस्टर मॅनेजमेंट कायदा आहे त्यातील अधिकारांचा वापर करून खासगी डॉक्टरांना समन्स पाठवण्याचा विचार करावा लागेल.

मालेगांव धारावीचे उदाहरण आपल्यासमोर आहे. जे सहकार्य तिथल्या लोकांनी केले तसेच सहकार्य संभाजीनगर शहरातील जनताही करेल आणि संकटावर मात करेल, अशी खात्री वाटते.

केंद्राने दिलेली मदत अजून राज्यात आलेली दिसत नाही. त्यामुळे आता उद्योगधंदा कसा सुरू होईल याकडे लक्ष द्यायला हवे. जसा आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे तसाच राज्याचा आर्थिक प्रश्नही महत्त्वाचा आहे. राज्याची आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी औद्योगिक क्षेत्र सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *