‘या’ तीन सुट्ट्या झाल्या जाहीर ; सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी -मुंबई – ता. २९ जुलै – कार्यालयीन कामकाज करण्याबरोबरच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी अधिकारी आणि कर्मचारी हे गुंतले असताना, गेल्या चार महिन्यांच्या कालावधीनंतर जिल्ह्यातील राज्य सरकारी कार्यालयांना तीन ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी सुटी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, रक्षाबंधन तसेच अनंत चतुर्दशी आणि घटस्थापना या दिवशीही सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर सुमारे ३० ते ३५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सरकारी कार्यालयांचे कामकाज सुरू आहे. काही सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कार्यालयीन कामकाज सांभाळत त्यांच्याकडून अतिरिक्त काम सांभाळण्यात येत आहे. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी जिल्ह्यातील राज्य सरकारी कार्यालयांना तीन ऑगस्ट रोजी रक्षाबंधनानिमित्त सुटी जाहीर केली आहे. याशिवाय एक सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आणि १८ ऑक्टोबरला घटस्थापनेला राज्य सरकारी कार्यालयांना सुटी असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *