कोकणात समुद्र खवळला; किनारपट्टीवर जनजीवन विस्कळीत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ मे ।। गेले चार दिवसांपासून कोसळणार्‍या मान्सूनपूर्व पावसाचा कहर सुरूच आहे. शुक्रवारी पावसाचा जोर काहीसा कमी असला, तरी अधून-मधून कोसळणार्‍या मुसळधार सरींमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.


शुक्रवारीही देवगड तालुक्यात पावसाचा जोर कायम होता. त्रिंबक – साटमवाडी – बांबर वाडीला जोडणारा कॉजवे पुराच्या पाण्याने वाहून गेला, तर मांगवली-ढवळेवाडी येथे लोंबकळणार्‍या वीज तारांचा शॉक लागून बैलाचा मृत्यू झाला. देवगड तालुक्यातील हुर्शी-गडदेवाडी येथे जनावरांचा गोठा कोसळून सुमारे 40 हजार रुपयाचे नुकसान झाले. दरम्यान मान्सूनच्या पार्श्वभूमीवर समुद्र खवळला असून बंदर विभागाने किनारपट्टीवर धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *