महाराष्ट्राला सर्वाधित आरोग्य साक्षर राज्य बनवणार – उद्धव ठाकरे

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – २७ सप्टेंबर – ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम तळागाळापर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी राज्यात नाविन्यपूर्ण मार्गाचा वापर करण्यात येत आहे. या मदतीने राज्याला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षर राज्य बनवणार, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अमरावती विभागातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांसोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते.

सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांच्या टास्क फोर्समधील डॉक्टरांसोबत संवाद साधून वैद्यकीय उपचार आणि इतर उपायांबाबत चर्चा करावी. पालक सचिव यांनीदेखील पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासन यांना संपर्कात राहावे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *