शेल्डन कॉट्रेलचं धमाकेदार पुनरागमन, डिकॉकचा मिडल स्टम्प उडवला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २ ऑक्टोबर – शारजा : क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. एक दिवस खेळाडू मॅच हरवतो, तर दुसऱ्याच दिवशी तोच खेळाडू धमाकेदार पुनरागमन करतो. आयपीएल (IPL 2020)मध्ये शेल्डन कॉट्रेल (Sheldon Cottrell)नेही असंच केलं आहे. वेस्ट इंडिजच्या या डावखुऱ्या फास्ट बॉलरने राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)विरुद्ध बऱ्याच रन दिल्या होत्या. राजस्थानने कॉट्रेलच्या एकाच ओव्हरला 5 सिक्स लगावल्या होत्या. यामुळे पंजाब (Kings XI Punjab) च्या टीमने जिंकलेली मॅच हरली होती.

मागच्या मॅचमधल्या खराब कामगिरीनंतरही पंजाबच्या टीमने कॉट्रेलला पुन्हा संधी दिली. या संधीचं कॉट्रेलने सोनं केलं. मुंबई (Mumbai Indians) विरुद्धच्या मॅचमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये कॉट्रेलने विकेट घेतली. मॅचच्या पाचव्या बॉलवरच कॉट्रेलने क्विंटन डिकॉकला बोल्ड केलं. कॉट्रेलचा आऊट स्विंग डिकॉकला समजलाच नाही, त्यामुळे त्याचा मिडल स्टम्पचं उडाला. कॉमेंट्री करत असताना इरफान पठाणने कोणत्याही डावखुऱ्या फास्ट बॉलरसाठी हा ड्रीम बॉल असल्याचं म्हणलं.

शेल्डन कॉट्रेलने यंदाच्या आयपीएल दरम्यान शानदार बॉलिंग केली आहे. पावरप्लेमध्ये कॉट्रेलने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या आहेत. कॉट्रेलचा जोडीदार शमीनेही या मोसमात पावरप्लेमध्ये 3 विकेट मिळवल्या. शेल्डन कॉट्रेलने एक मॅच सोडून या मोसमात चांगली बॉलिंग केली. यंदा कॉट्रेलने 6 विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकोनॉमी रेट मात्र 8.46 एवढा आहे. मुंबई विरुद्धच्या मॅचमध्ये मात्र त्याने 4 ओव्हरमध्ये 20 रन देऊन 1 विकेट घेतली.

मराठा आरक्षण; , येत्या 6 ऑक्टोबरला ‘मातोश्री’बाहेर आंदोलन, 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २ ऑक्टोबर – मुबई :मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा आरक्षण संघर्ष समितीने येत्या 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. 6 ऑक्टोबरला ‘मातोश्री’बाहेर आंदोलन तर 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा मराठा संघर्ष समितीने दिला आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयामध्ये संघर्ष समितीने पत्रकार परिषद घेतली. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाचे आरक्षण मिळालेले थांबले. राज्य सरकारला येत्या 9 ऑक्टोबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. तो पर्यंत जर मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 10 तारखेला महाराष्ट्र कडकडीत बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशारा मराठा समितीच्या नेत्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *