महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ४ ऑक्टोबर – मुंबई – :अभिनेत्री मिष्टी मुखर्जी (वय २७) च्या अकाली निधनाने बंगाली व हिंदी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. या वर्षांत अनेक नामांकित अभिनेते आणि अभिनेत्रींनी जगाचा निरोप घेतला. सुशांत सिंग राजपूत, इरफान खान, ऋषी कपूर असे अनेक दिग्गज या जगातून गेले. आता मिष्टीच्या जाण्याने बंगाली आणि हिंदी सिनेमासृष्टीत शोककळा पसरली आहे. मिष्टी अनेक दिवसांपासून किडनी विकाराने त्रस्त होती. यातच तिचे निधन झाले.
‘मैं कृष्णा हूं’ या मालिकेतून 2013 साली मिष्टीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. ‘मैं कृष्णा हूं’मध्ये डान्स नंबर केल्यानंतर ती दिग्दर्शक राकेश मेहता यांच्या ‘लाईफ की तो लग गई’ या सिनेमात झळकली. मिष्टीने अनेक आयटम नंबर्समध्ये काम केले. अनेक मोठ्या पार्ट्या व इव्हेंटमध्ये ती दिसायची. अनेक बंगाली सिनेमांतही तिने काम केले.